Sunday, December 30, 2018

नवी विटी - राज्य तेच


                          मोठ्याबाई (सौ.आशाताई राजदेरकर) दि. ११ सप्टेंबर १९७५ रोजी सेवानिवृत्त झाल्या आणि आमच्या ग. . शाळेवरील ११ वर्षांचा एक छत्री अंमल संपला. ह्या ११ वर्षांच्या सलग कारकिर्दीत राजदेरकरबाईंनी माझी शाळाह्या भावनेतून ग. .ला सतत नंबर१वर ठेवले. राजदेरकरबाई तसेच त्यानंतर आलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शाळेच्या शिस्तीत कोणतेच बदल न करता, आपल्या नव-नवीन कल्पनांनी शालेय कामकाजात र टाकली.

                          खाजगी शाळांप्रमाणे आमच्या सरकारी शाळेत शिक्षकवृन्दातून मुख्याध्यापक पदोन्नती मिळत नाही. शासकीय व्यवस्थापनात खो-खो चा खेळ चालू असतो. राज्य सरकारच्या यादीतील सेवाज्येष्टतेनुसार आमच्या शाळेत मुख्याध्यापिकांची नेमणूक होत असते. शासकीय खो-खोच्या खेळांत खूपदा आमच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची जागा रिकामी  असे. शाळेच्या कामकाजात ह्या गोष्टीची उणीव कधीभासू न देण्याचे इंद्रनुष्य पेलले होते; आमच्या सुपरवायझर असलेल्या सौ. शुभांगी (श्रद्धा) जोशीबाईंनी.  

सौ. आशाताई राजदेरकरबाई सेवानिवृत्त झाल्यावर, . .ला लाभले; अतिशय व्यासंगी, हुशार, विद्वान व्यक्तिमत्त्व. . .च्या मुख्याध्यापिका पदी रुजू झालेल्या श्रीमती सुशिला टिळकबाईंचा वेद, उपनिषदे ह्यांचा गाढा अभ्यास होता. सखोल अभ्यास करुन सेंट्रल हॉलमध्ये विविध विषयांची माहिती सांगायच्या. त्यांच्या भाषणांतून खूप काही शिकायला मिळायचे. विषयाशी एकरुप होऊन पोटतिडकीने बोलताना, त्यांचा आवाज त्यांच्याही नकळत इतका मोठा व्हायचा की, माईकलाही रजा घ्यायला हरकत नाही ! हा गमतीचा भाग सोडला तरी एकला चलो रेअसलेल्या ह्या व्यक्तिमत्वास आपला ठसा शाळेवर उमटविण्यास शासनाने वेळच दिला नाही. त्यांच्या अल्प-कालावधीत आमची ५ ते १०वी ची शाळा व नुकतेच सुरु झालेल्या ज्युनिअर कॉलेजची ११वी (शास्त्र, कला,वाणिज्य) व्यवस्थित वाटचाल करीत होती. ११वीची एक विद्यार्थिनी ऐन वार्षिक परीक्षेच्यावेळी आजारी पडली. टिळकबाईंनी जून महिन्यात ह्या विद्यार्थिनीची रीतसर परिक्षा घेतली. एका विद्यार्थिनीसाठी सर्व विषय शिक्षकांनी आपआपल्या विषयांचे पेपर काढले. तिच्या उत्तरपत्रिका तपासून तिला ११वी पास झाल्याची गुणपत्रिका दिली. टिळकबाईंच्या ह्या निर्णयामुळे ह्या विद्यार्थिनीचे वर्ष वाया गेले नाही. टिळकबाईंची लगेचच बदली झाली आणि सौ जोशीबाईंच्या नेतृत्वाखाली आमची शाळा नदीच्या प्रवाहाप्रमाणे दिमाखात वाटचाल करीत राहिली.

                      काही महिन्यांनी अतिशय तरुण, छोटीशी सावळी  मुर्ती मुख्याध्यापिकेच्या जागेवर विराजमान झाली. Direct Recruit झालेल्या सौ. काकणबाई स्वभावाने अतिशय शांत व्यक्तिमत्त्व. कुणाशीही वाईटपणा न घेणाऱ्या ह्या बाईंनी शाळेच्या व्यवस्थापनांत कोणतेच बदल केले नाहीत. शिस्तप्रिय सुपरवायर बाई (सौ. जोशीबाई)काटेकोरपणे शाळा सांभाळत होत्या. शाळेचा प्रत्येक घटक आपली जबाबदारी ओळखून काम करीत होता. सौ. काकणबाईंच्या कारर्किदीत शाळा दिमाखात चालू असताना, राज्यातील शिक्षकांचा मोठा संप झाला. आम्ही सर्व शिक्षक संपावर गेलो होतो. शाळेची सहल बडोदा, अहमदाबाद वगैरे गुजराथमधील ठिकाणी जाणार होती. एक दिवस काकणबाईंचा मला घरी निरोप आला. मुलींची जबाबदारी असल्याने, तुम्ही गुजराथ सहलीला जाण्यास तयार असाल तर शाळेची सहल जाईल अन्यथा ही सहल मी रद्द करणार आहे. शिक्षक-संपातून बाहेर न पडता, शाळेच्या गुजराथ सहलीची जबाबदारी मी पूर्ण केली. जहाजाच्या कप्तानाप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिकेला शाळेची जबाबदारी घ्यावी लागते, हेच खरे.

                    अल्पावधीत सौ. काकणबाईंची बदली होऊन शाळेचा चार्ज खालच्या मजल्यावर असलेल्या ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिन्सिपॉलबाईंकडे गेला. दोन ठिकाणचा चार्ज सांभाळताना, त्यांनीही शाळेच्या व्यवस्थापनात कोणतेच बदल केले नाहीत. सौ. जोशीबाई आमच्या शाळेची नौका व्यवस्थित वल्हवित होत्या. ह्या प्रिन्सिपॉलबा ईंची बदली झाली. बरेच महिने आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका पद रिकामे होते.

                    जागतिक किर्तीचे गणित तज्ज्ञ श्री. जयंतराव नारळीकर ह्यांचे गावातील एच. पी. टी. कॉलेजमध्ये व्याख्यान होते. सर्व शाळेतील विद्यार्थी हे भाषण ऐकायला कॉलेजमध्ये गेले होते. आमच्या शाळेतील विद्यार्थिनींना घेऊन आम्ही सर्व शिक्षिका व शिक्षक ह्या व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान कळण्याइतपत शालेय विद्यार्थ्यांचे वय नव्हते, परंतु जागतिक किर्तीचे एक महान व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पहायला मिळाले. व्याख्यान संपल्यावर, दिडच्या सुमारास आम्ही सर्वजण शाळेत परत आलो. आल्या-आल्या बातमी मिळाली की, नव्या मुख्याध्यापिका शाळेत हजर झालेल्या आहेत.

                  नव्या मुख्याध्यापिकाबाईंचे आज आगमन आहे’, हे आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हते. शाळेत फक्त क्लार्क व शिपाई होते. घड्याळात ११ वाजले असताना; एक उंच, धिप्पा, चष्मा लावलेली, नीटनेटका पोशाख केलेली, केस काळेभोर, मानेवर केसांचे चक्कर त्यावर गुलाबाचे फुल, रंग काळा पण त्यांच्या चालण्याच्या रुबाबात तो झाकून गेलेला, अशी व्यक्ती जिना चढून क्लार्कच्या ऑफिसमध्ये आली. क्लार्कमंडळी पहातच राहिली, ही व्यक्ती कोण? त्या व्यक्तीने आपली ओळख दिली, “मी ह्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून शाळेत रुजू होत आहे”. क्लार्क कंपनी अंधारात होती. त्यांना कोणतीच कल्पना नव्हती; पण वेळेतच सावरुन, नमस्कार करुन, त्यांनी बा ईंना खुर्ची दिली. असा आमच्या मोठ्याबाईंचा आदरणीय सरिता उजागरेबाईंचा ग. . तील पहिला दिवस.

क्रमशः

श्रीमती प्रभा आठवले

 सेवानिवृत्त शिक्षिका,

  . . हायस्कूल, नाशिक

Sunday, March 18, 2018




. . गवाक्ष :-
सौ. विमल (वसुमती) मानेबाई (माजी सुपरवायझर - . . हायस्कूल, नाशिक)

                                     पहाटे ५-५॥ ची वेळ होती. आमच्या शाळेची मुलींची सहल सापुताऱ्यास चालली होती. सहलप्रमुख सौ. मानेबाई; त्यांच्या मदतीस आम्ही ३ शिक्षिका व १ शिपाई असे मुलींसोबत चाललो होतो. बसमध्ये मुलींच्या भेंड्या, गाणी, गप्पा, मोठ्याने बोलणे - हसणे अशी मजेत दंगा-मस्ती सुरु होती. सहलीचा आनंद मुक्तपणे लुटणे चालू होते. आता त्यांच्यावर शाळेतील कोणतीच बंने नव्हती. इतक्यात ड्रायव्हरने बसला अचानक ब्रेक लावला. बस थांबली. मुली किंचाळायला लागल्या.

                                         काय झाले?’ एकच प्रश्नचिन्ह उभे राहिले. समोरचे दृश्य पाहून, आम्ही हादरलो. आमच्या सौ. मानेबाईंनी चूपअसे मोठ्याने म्हटले. मुली एकदम शांत. मानेबाई पर्स घेऊन, बसमधून रस्त्यावर उतरल्या. आम्ही शिक्षिका व शिपाई खाली उतरलो. यंकर दृश्य समोर उभे होते. -८ दांडगी-राकट माणसे, काठ्या व कुऱ्हाडींसह बससमोर उभी होती. रस्ता मोठ्या दगडांनी व काट्यांनी अडविलेला होता. आमच्या मानेबाई हाताची घडी घालून त्या लोकांसमोर उभ्या राहिल्या. शांत स्वरांत न घाबरता त्या लोकांना म्हणाल्या,बाबांनो, तुम्हाला काय हवे? आम्ही मुलींना घेऊन सहलीला चाललो आहोत. आमच्या जवळ फक्त जेवणाचे डबे आहेत.”

                                   आमच्या मानेबाईंचा शांत, धीरगंभीर आवाज ऐकून, ते वाटमारी करणारे लोक वरमले. त्यांचा म्होरक्या म्हणाला, “बाई, आम्हाला फक्त १ रुपया द्या. काही न मिळवता रिकाम्या हाताने परत जाणे, आमच्या धंद्याच्या नियमांत बसत नाही.” सौ. मानेबाईंनी त्यांना एक रुपया दिला व आमचा मार्ग मोकळा झाला. काही व्यक्ती आपल्या सात्विक आचार-विचारांतून संकटाला तोंड देतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मानेबाई.

                                मानेबाई आमच्या मुख्याध्यापिका सौ. राजदेरकरबाईंचा उजवा हात. मोठ्याबाईंचे (सौ राजदेरकरबाईंचे) मुलींवर संस्कार करण्यासाठी विवि प्रयोग चालत. त्यांना साथ होती, मानेबाईंची. आम्हा शिक्षिकांमध्ये त्या मिळून-मिसळून वावरत असत. आपल्या मृदुवाणीनी त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या वाणीत मृदुता तर होतीच पण थोडी जरबही जाणवायची. त्यामुळे त्यांनी सांगितलेले काम केलेच जायचे. त्यांनी आम्हा शिक्षकांना बोलावले तर आम्ही पळत त्यांच्यासमोर हजर रहावेही त्यांची अपेक्षा. ‘प्रत्येक व्यक्तीने चपळ राहिले पाहिजे’, हा त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन.

                                 सावळा रंग, बोलके डोळे, उंचीला योग्य असा बांधा, टापटिपीने नेसलेली व्यवस्थित साडी व योग्य ब्लाऊज, किंचित कुरळे केस. केसाचे चक्कर घातलेले व खांद्यावर पर्स अशा थाटात मानेबाईंचा शाळेत सर्वत्र वावर असे. कारण त्या शाळेच्या सुपरवायझर होत्या ना ! शाळेतील वातावरण प्रसन्न व शिस्तित राखण्यावर त्यांचा कटाक्ष होता. शाळेचे व्यवस्थापन पहात असल्या तरी त्यांना अध्यापनाचे काम करावे लागायचे. त्या जन्मजात शिक्षक असल्यामुळे, आपले काम चोख करीत असत.

                             शासकीय नियमाप्रमाणे त्यांची बदली झाल्याने त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. आमच्या शाळेशी असलेला त्यांचा संबं तुटला; तरी त्यांनी आमच्याशी जोडलेले जिव्हाळ्याचे संबंध अखंड जपले.

श्रीमती प्रभा आठवले

(माजी शिक्षिका . . हायस्कूल, नाशिक)

Sunday, March 4, 2018


. . चे संस्कार रंग :-

                       शाळा चालू झाली - दि १५ जून १९७० - शाळेत प्रवेश करावयाचा म्हणजे व्यवस्थित पोशाख, पर्स, पर्समध्ये पेन, चष्मा, पेन्सिल, खोडरबर, डायरी, ब्लेड, रुमाल, छत्री, पाण्याची छोटी बाटली असा सर्व सरंजाम सांभाळावा लागतो. त्याचबरोबर वेळेचे बं. आता हातावरील घड्याळ ही शोभेची वस्तू राहिली नाही तर वेळोवेळी वेळेचे भान ठेवण्यासाठी, त्याचा उपयोग होऊ लागला.

                          शाळा सकाळी ११:१० ला सुरु शाळेची घंटा घणघणू लागली की शाळेचे आवार विद्यार्थिनी, शिक्षक, शिपाई, कर्मचारी ह्यांनी फुलून जायचे. शाळेची पहिली शिस्त - वेळेच्या आधी ५ मिनिटे हजर राहिलेच पाहिजे.

                             शाळेची सुरुवात सेंट्रल हॉलमधील प्रार्थनेने व्हावयाची. प्रार्थना वाद्य,संगीताच्या तालावर व्हावयास पाहिजे. शिक्षकांसमवेत सर्व वर्गाच्या रांगा, आगगाडीच्या डब्यांप्रमाणे सेंट्रल हॉलमध्ये आपआपल्या जागेवर स्थिर व्हावयास हव्या. प्रार्थना हॉलमध्ये पूर्ण शांतता हवी. आमच्या शाळेची शिस्त फार कडक, कारण मुख्याध्यापिका शिस्तप्रिय. ‘भ्यास एके अभ्याहे त्यांचे धोरण नव्हते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षणह्या दृष्टीकोनातून सर्व उपक्रम राबविले जात होते. प्रार्थनेनंतर वर्गांप्रमाणे दिनविशेष, तिथी, वार, सवंत्सर, मराठी महिना, इंग्लीश महिना, साल, नक्षत्र वगैरे  माहिती विद्यार्थिनी सांगायच्या. मुलींचे-शिक्षकांचे वाढदिवस, शाळेच्या बागेतील फूल देऊन साजरे व्हायचे. वर्तमान पत्रातील घडामोडी, शास्त्रज्ञांची माहिती, नवीन लागलेला शो वगैरे अनंत गोष्टींचा परामर्श, विद्यार्थिनींमार्फत शिक्षकांना घ्यावा लागे. वर्गातील प्रत्येक मुलीचा सहभाग पाळी-पाळीने होत असे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संबंधांत जवळीक निर्माण होत असे. गुरु-शिष्य संबंध नकळत दृढ व्हावयाचे. आपल्या वर्गाकडे दिलेली कामगिरी उत्कृष्टपणे सादर करण्यात अहमिका लागावयाची.

                        त्यातच श्रीमद् भगवद् गीतेचा १५वा अध्याय, ९वा अध्याय तालासुरांत सामुहिकरित्या म्हटला जायचा. एखादे देशभक्तीपर गीत सर्व शाळेतर्फे बसविण्यात यायचे.

                         अशा लांबलचक कार्यक्रमांच्या पूर्तीनंतर प्रार्थना संपावयाची. सर्व वर्गांनी शिस्तीत परत जावयास हवे. त्यानंतर तासाप्रमाणे अध्ययन-ध्यापन सुरु व्हावयाचे. ल्या सुट्टीच्या ३ तासिका  आधी १०मिनिटांची सुट्टी असायची.

                          ल्या सुट्टीत पोळी-भाजी, भाकरी-भाजीचा डबा खायचा. डब्यात लाडू- चिवडा, मिठाई, बिस्किटे ह्यांना बंदी होती. धू - धून शिक्षकांना डब्यांची तपासणी करावी लागत असे. श्रीमंत-गरीब उच्च-नीच असा आप-परभाव निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक वर्गाने गोल करुन, झाडाखाली डबा खावयास पाहिजे, ही शिस्त.

                           शाळा सुटण्याच्या आधी शेवटचा ९वा तास खेळाचा. शिक्षकांसहित सर्व विद्यार्थिनींनी, शाळेच्या पटांगणांवर खेळलेच पाहिजे, ही शाळेची शिस्त.

                       रोज दुपारी व  शनिवारी सकाळी शाळेच्या वेळात कोणीही बाहेर जायचे नाही. जायचे असल्यास, परवानगी काढावी लागे; अगदी शिक्षकांना सुद्धा.

                       आमच्या मुख्याध्यापिका ह्या एक आदर्श शिक्षिका तर होत्याच त्यात उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञ होत्या. ‘शिक्षण म्हणजे संस्कारहा मंत्र त्यांनी कार्यान्वित केला. शाळेत निवडणुका होऊन विद्यार्थिनींचे मंत्रिमंडळ कार्यक्रमाचे व्यवस्थापन सांभाळायचे. लोकशाही कारभाराचे धडे विद्यार्थीदशेत आपोआप मिळायचे. संपूर्ण शाळेची विवि गटांमध्ये विभागणी केली जायची. प्रत्येक गटात ५वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा समावेश असायचा. असा हा लहान-थोर मुलींच्या गटांचे एक कुटुंब बनायचे. ह्या गटांमध्ये खेळ, नाटक, जने, कविता कथा-कथन, स्वच्छता, समूहगीत, भावगीत, जने, पुष्परचना, रांगोळी अशा अनंत स्पर्धा व्हावयाच्या. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व, संगीत, नेतृत्व,अनुयायित्व,एकात्मता, सामाजिक बांधिलकी अशा विवि गुणांची जोपासना नकळत व्हावयाची. उत्साही कार्यतत्पर मुख्याध्यापिकेच्या सहवासात शिक्षिकाही आपोआप तयार व्हावयाच्या.

                           शाळेच्या सेंट्रल हॉलच्या भिंती जवळ-जवळ २०० नकाशांनी सुशोभित केलेल्या होत्या. भारतातील तसे महाराष्ट्रातील पिक-पाणी, लोकवस्ती, नद्या, खनिजे, प्रसिद्ध शहरे ह्यांचे आकर्षक नकाशे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींच्या सहाय्याने शिक्षकांनी तयार करुन घेतले होते. हंसत-खेळत चालता-बोलता तिहास-भूगोल सदैव शाळेच्या नजरेसमोर उभा राहिला.

                               एवढे प्रचंड उपक्रम राबवीत असताना, शालेय अभ्यासक्रम कुठेही मागे राहिले नाहीत. स्कॉलरशिप ७वी च्या परिक्षेसाठी हुशार मुलींची तयारी शिक्षक शाळेत जास्त वेळ थांबून करुन घेत असत. ह्या क्लासबरोबर इंग्लिश, हिंदी, ड्रॉईंगच्या शाला-बाह्य परिक्षांसाठी त्या-त्या विषयांच्या विषय शिक्षकांवर शाळेत क्लास घ्यायची, जबाबदारी टाकली जायची. सर्व शिक्षक सुट्टीच्या दिवशी तसेच लवकर शाळेत येऊन हे काम निष्ठेने पार पाडायचे. मुख्य म्हणजे ह्या क्लासला कोणतीही फी आकारली जायची नाही. बाहेरच्या जगातील परिक्षा नुसत्या पास होऊन चालायचे नाही. प्रत्येक विद्यार्थिनीचे व त्याबरोबर वर्गाचे  percentage वाढले पाहिजे. ह्यावर आमच्या मोठ्या बाईंच्या कटाक्ष असे. आमच्या विद्यार्थिनी बाह्य विश्वातील यश स्व-मेहनतीने खेचून आणायच्या.

                       २६ जानेवारी १५ ऑगस्ट थाटात व रुबाबात साजरे व्हावयाचे. सर्व शाळांची पोलीस-परेड ग्राऊंडवर २ आठवडे आधी एकत्रित तालीम चालायची. सर्वांचा गणवेश स्वच्छ पाहिजे. हिरवा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज, लाल रिबीनींनी वर बांधलेल्या दोन वेण्या हा ग. . चा गणवेश. शालेय गणवेशाचे वार – ‘सोमवार, बुधवार, शनिवार’. ज्या मुलींकडे एकच गणवेश असेल, त्यांना तो

धुऊन वाळवून घालता यावा, हा उदात्त हेतू. वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालण्याची मुभा होती. राष्ट्रीय सणांना ५वी ते ११वी सहभाग असावा, ही मोठ्याबाईंची अपेक्षा असे. हजेरी घेतली जात असे. अनुपस्थित राहिल्यास, पालकांच्या चिठ्या आणल्या पाहिजेत; ही शिस्त. शालेय जीवनांत राष्ट्रीयतेची जाणीव असावी, हा मोठ्या बाईंचा उद्देश.

                                संक्रातीचे-शुक्रवारचे हळदकूंकू, पंढरपूरची दिंडी, स्नेहसंमेलन वगैरे विविध कार्यक्रम राबविले जायचे. शाळेत आलेल्या फ्रेंच पाहुण्यांसाठी भारतीय विवाह सोहळा, बांगला देश मुक्ती युद्धाच्या नकाशाच्या सहाय्याने मोठ्याबाईंनी सांगितलेल्या ताज्या युद्ध घडामोडी, मुलींनी साकारलेली शिवशाही, तसेच ऑक्रेस्ट्रा असे सेंट्रल हॉलमध्ये मुलींनी साजरे केलेले कार्यक्रम आजही आठवतात.

                             शाळेच्या वर्गाबाहेरील फलकांवर नित्य-नवीन माहिती सदैव लिहिली जायची. मुलींची शाळा असल्यामुळे होम-सायन्स, शिवण हे विषय चित्रकला-गायना इतकेच महत्वाचे मानले जायचे. संक्रान्तीचे लाडू होमसायन्स डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थिनींकडून बनविले जात. परसातील बागकाम मेथी, कोथिबींर, भाज्या वगैरेंचा छोटेखानी बाजार भरवत असे. भाजीवाल्या चिमुरड्या मुली त्याचा खूप आनंद लुटत असत. शिक्षकांच्या देखरेखीखाली स्नेहसंमेलनाचा नास्ता, होमसायन्समध्ये विद्यार्थिनी बनवायच्या;  स्वच्छ-स्वस्त-मस्तहोई.

                      हरितालिकेचे जागरण, सहली वगैरे विविध उपक्रमांमुळेभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. शाळेचे रिझल्ट चांगलेच पाहिजेत. इन्स्पेक्शन रिपोर्ट चांगलाच हवा. ही सर्व तारेवरची कसरत असे, कुरकुर करावयास जागाच नव्हती. त्यातच शाळेचा सुवर्ण-महोत्सव धुडाक्यात पार पडला. शाळेतील नावारुपाला आलेल्या माजी विद्यार्थिनींना निमंत्रणे गेलीच पण गृहिणी म्हणून वावरत असलेल्या विद्यार्थिनींची शाळेने आवर्जून आठवण  ठेवली.

                                  अशा ह्या आमच्या मुख्याध्यापिका व्यासंगी, कल्पक, शिक्षणासंबधी सखोल विचार करणाऱ्या आनंदी, उत्साही होत्या. पण त्यांना B.P.चा त्रास असल्यामुळे, काहीवेळा खूप संतापायच्या. असे हे बुद्धीमत्तेचे तेज असलेले सौंदर्य, रागाने लालेलाल झाले की, मात्र सर्वांना खूप भिती वाटायची.

                                शाळा हेच आपले घरसमजणाऱ्या सौ. आशाताई राजदेरकरबाई (मोठ्याबाई) ११ सप्टेंबर १९७५ ह्या दिवशी सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीच्या वेळी त्या खूप गहिवरुन आल्या. ‘माझी शाळाह्या भावनेने त्या शाळेत मधू-धून यावयाच्या.

                            शाळा सोडली त्यानंतर काही वर्षांनी वृद्धापकाळाने   जगाचा निरोप घेऊन दुसऱ्या जगात आपल्या कल्पना प्रत्यक्षांत राबविण्यासाठी त्या निघून गेल्या.

प्रभा आठवले

माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः

Friday, January 26, 2018

मी बाईबाईझाले !
                                      नुकतेच नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारकतर्फे शिक्षणशास्त्र विद्यालय सुरु झाले होते.मनाने एकच ध्यास घेतला B.Ed.व्हावयाचे.  
                                         सकाळचे कॉलेज, दुपारी Lessonsअशा धावपळीत दिवस उगवायचा आणि  संपायचा. विद्यार्थी म्हणून अभ्या- परिक्षा, विवि स्पर्धांध्ये भाग तर घरी आल्यावर माता गृहिणी, कुटुंब- व्यवस्थापक अशा भुमिका पार पाडताना; ‘जग ही रंगभूमी असून, व्यक्ती ह्या रंगमंचावरील पात्रे आहेतह्या वाक्याचे प्रत्यंतर अनुयास मिळाले.
                                         माझी B.Ed.ला इंग्लिश व मराठी मेथड होती. इंग्लिश शिकविणारे शिक्षक कमी म्हणून एक आशा होती. मी B.Ed.ला मेथड म्हणूनइंग्लिशविषय घ्यावयास मागेपुढे पहात होते, कारण शिक्षणात बराच खंड पडला होता. इंग्लिश ही परकीय भाषा. ‘व्याकरणहा भाषेचा मुख्य गाभा. शिक्षकीपेशाला व्याकरणशुद्ध भाषायेणे आवश्यक, मग ती कोणतीही भाषा असू दे. माझ्या मिस्टरांनी मला सांगितले, “तुला B.Ed.होऊन नोकरी करावयाची असेल तर तुला इंग्लिश हा विषय घ्यावाच लागेल, नाहीतर B.Ed.होण्यात काही अर्थ नाही. फक्त मनाच्या समाधानासाठी तू तुझ्या नावापुढे B.A.B.Ed.फक्त लिहू शकशील.” मनाचा हिय्या केला व इंग्लिश भाषा मेथड म्हणून घेतली. दुसरा विषय सोपा म्हणून मातृभाषा मराठी घेतला. आमच्यावेळी लेखी परिक्षा घेऊन, मेथडचे विषय देत असत. इंग्लिश, मराठी ह्या विषयांबरोबरभूगोलह्या विषयाची परिक्षा मी दिली. न जाणो इंग्लिशमध्ये आपण नापास झालो तर मनात धाधुक होती. आश्चर्याचा क्का म्हणजे मी तीनही विषयात पास झाले. आता निर्णय घेणे माझ्या हातात होते. मी इंग्लिश व मराठी हे दोन विषय निवडले.
                                          आमच्याबरोबर एका शाळेचे मुख्याध्यापक होते. ते इंग्लिशमध्ये नापास झाले. इंग्रजी विषय घेणारे विद्यार्थी थोडे, त्यात परिक्षेत पास होणारे अल्प ! अशा अल्पसंख्याकात मी पास होऊन समाविष्ट झाले. ‘ह्या बाई इंग्रजी विषयात पास कशा झाल्या?’ ह्याचे त्या मुख्याध्यापकांना खूप आश्चर्य वाटायचे. शेवटी प्राचार्यांची विनवणी करुन, त्यांना इंग्लिशविषय मिळाला.वर्षर विद्यार्थी जीवन enjoy  करीत मी B.Ed.ची परिक्षा पास झाले. मी प्रशिक्षित पदवीर शिक्षक होऊन, मी बेकारीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागले.
                                 नोकरीसाठी अर्ज खरडणे सुरु झाले. एक आशा मात्र निश्चित होती की, आपल्याला नोकरी निश्चित मिळेल; पणकेव्हा? आणि कोठे?’ हा प्रश्न अधांतरी होता. प्रतिक्षा करण्यात १५ दिवस निघून गेले. आता मात्र मनांत शंका येऊ लागली, ‘आपण कुठेही वशिला लावू शकत नाही. कारण ते मनाला पटत नव्हते. आपल्या अर्जाला केराच्या टोपलीत स्थान!’ १५ दिवसांनी मुलाखतीच्या बोलाविण्याची पत्रे येऊ लागली. तारखा  निरनिराळ्या होत्या, म्हणून बरे.
                                        आपल्या गुणपत्रिकांची फाईल घेऊन शाळांध्ये जावे लागे. एका ठिकाणी फाईल पाहून, निवड समितीतल्या एकांनी विचारले, “दिंडोरीला जायची तयारी आहे का? आता ऑर्डर हातात देतो.” मी दिंडोरीला जाणे शक्य नव्हते. ‘नाहीकाही म्हटले नाही. हुकमी एक्का हातात ठेवून सांगितले, “विचार करुन सांगतेआणि घरी परत आले.
                                     -३ ठिकाणी मुलाखतीला जाऊन आले. तिथे खूप उमेदवार होते, काही फर्स्ट क्लास M.A.,M.Com.,M.Sc. माझे धाबे दणाणले ह्यातून आपला निभाव लागणे अशक्य. मुलाखती दिल्या पण वाट पहाणे सोडून दिले. काही दिवस असेच गेले, मार्ग सापडेना !
                                     जून महिना सुरु झाला. एके दिवशी ग. . हायस्कूल (नाशिक)चा शिपाई दुपारचा घरी आला आणि सांगायला लागला, “तुम्हाला मोठ्याबाईंनी ताबडतोब बोलाविले आहे.” मी झटपट तयार झाले व शाळेच्या आवारांत प्रवेश केला. ती व्य दगडी इमारत, गर्द झाडीमध्ये कारंजा, त्यात मासे-कमळे पाहून मी भांबावले. मनांत विचार, ‘मोठ्याबाईंनी कशाला बोलाविले? नेमणूकीसाठी तर बोलाविले नसेल ना?’
                             गोंधळलेल्या मनःस्थितीत मी ऑफीसमध्ये प्रवेश केला.   बेताची उंची, स्थूल बांधा, गोऱ्यापान, सुंदर, मोठ्या केशसंभारावर माळलेली फुले, हंसतमुख अशा बाईंनी माझे स्वागत केले. मला बसावयास सांगितले. त्या म्हणाल्या, “तुमच्या नेमणूकीची ४ शाळांमधून पत्रे निघालेली आहेत. आमच्या शाळेचे नेमणूकीचे पत्र तुम्हाला येईल. आमची शाळा त्या शाळांपेक्षा उशीरा सुरु होईल तरी तुम्ही दुसऱ्या शाळेची नेमणूक स्वीकारु नका. १५ जूनला आमची शाळा सुरु होते. बरोबर ११ वाजता हजर व्हा. नेमणूकपत्र उशीरा येईल. काळजी करु नका. हजर झालेल्या दिवसांपासून तुमचा सेवाकाल सुरु होईल.” हे ऐकून मी स्वप्नांत तर नाही ना! असे मला क्षणभर वाटले. हवेत तरंगतच मी आनंदात घरी केव्हा पोहोचले? ते मला समजले नाही.
                      दि. १५ जून १९७० ला मी ग. . शाळेत शिक्षिका म्हणून हजर झाले. त्याकाळी इतर शाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळत नव्हते. . . हायस्कूल सरकारी शाळा असल्याने, मला सेवानिवृत्ती वेतन मिळणार होते.
                           खऱ्या अर्थाने मी बाईझाले. आत्तापर्यंत समाज मला आठवलेबाईम्हणून ओळखत  होता. कारण विवाहानंतर माझे आडनाव आठवलेझाले होते. मोलकरीण मला बाईम्हणत असे किंवा रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ति, “अहो बाईम्हणून संबोत असे.
                                  ग ग हायस्कूल विद्यार्थिनींची आमच्या बाईह्या उपाधीने मी आठवलेबाईम्हणून समाजात मान्यता पावले.
    प्रभा आठवले
माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः