Friday, January 26, 2018

मी बाईबाईझाले !
                                      नुकतेच नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारकतर्फे शिक्षणशास्त्र विद्यालय सुरु झाले होते.मनाने एकच ध्यास घेतला B.Ed.व्हावयाचे.  
                                         सकाळचे कॉलेज, दुपारी Lessonsअशा धावपळीत दिवस उगवायचा आणि  संपायचा. विद्यार्थी म्हणून अभ्या- परिक्षा, विवि स्पर्धांध्ये भाग तर घरी आल्यावर माता गृहिणी, कुटुंब- व्यवस्थापक अशा भुमिका पार पाडताना; ‘जग ही रंगभूमी असून, व्यक्ती ह्या रंगमंचावरील पात्रे आहेतह्या वाक्याचे प्रत्यंतर अनुयास मिळाले.
                                         माझी B.Ed.ला इंग्लिश व मराठी मेथड होती. इंग्लिश शिकविणारे शिक्षक कमी म्हणून एक आशा होती. मी B.Ed.ला मेथड म्हणूनइंग्लिशविषय घ्यावयास मागेपुढे पहात होते, कारण शिक्षणात बराच खंड पडला होता. इंग्लिश ही परकीय भाषा. ‘व्याकरणहा भाषेचा मुख्य गाभा. शिक्षकीपेशाला व्याकरणशुद्ध भाषायेणे आवश्यक, मग ती कोणतीही भाषा असू दे. माझ्या मिस्टरांनी मला सांगितले, “तुला B.Ed.होऊन नोकरी करावयाची असेल तर तुला इंग्लिश हा विषय घ्यावाच लागेल, नाहीतर B.Ed.होण्यात काही अर्थ नाही. फक्त मनाच्या समाधानासाठी तू तुझ्या नावापुढे B.A.B.Ed.फक्त लिहू शकशील.” मनाचा हिय्या केला व इंग्लिश भाषा मेथड म्हणून घेतली. दुसरा विषय सोपा म्हणून मातृभाषा मराठी घेतला. आमच्यावेळी लेखी परिक्षा घेऊन, मेथडचे विषय देत असत. इंग्लिश, मराठी ह्या विषयांबरोबरभूगोलह्या विषयाची परिक्षा मी दिली. न जाणो इंग्लिशमध्ये आपण नापास झालो तर मनात धाधुक होती. आश्चर्याचा क्का म्हणजे मी तीनही विषयात पास झाले. आता निर्णय घेणे माझ्या हातात होते. मी इंग्लिश व मराठी हे दोन विषय निवडले.
                                          आमच्याबरोबर एका शाळेचे मुख्याध्यापक होते. ते इंग्लिशमध्ये नापास झाले. इंग्रजी विषय घेणारे विद्यार्थी थोडे, त्यात परिक्षेत पास होणारे अल्प ! अशा अल्पसंख्याकात मी पास होऊन समाविष्ट झाले. ‘ह्या बाई इंग्रजी विषयात पास कशा झाल्या?’ ह्याचे त्या मुख्याध्यापकांना खूप आश्चर्य वाटायचे. शेवटी प्राचार्यांची विनवणी करुन, त्यांना इंग्लिशविषय मिळाला.वर्षर विद्यार्थी जीवन enjoy  करीत मी B.Ed.ची परिक्षा पास झाले. मी प्रशिक्षित पदवीर शिक्षक होऊन, मी बेकारीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागले.
                                 नोकरीसाठी अर्ज खरडणे सुरु झाले. एक आशा मात्र निश्चित होती की, आपल्याला नोकरी निश्चित मिळेल; पणकेव्हा? आणि कोठे?’ हा प्रश्न अधांतरी होता. प्रतिक्षा करण्यात १५ दिवस निघून गेले. आता मात्र मनांत शंका येऊ लागली, ‘आपण कुठेही वशिला लावू शकत नाही. कारण ते मनाला पटत नव्हते. आपल्या अर्जाला केराच्या टोपलीत स्थान!’ १५ दिवसांनी मुलाखतीच्या बोलाविण्याची पत्रे येऊ लागली. तारखा  निरनिराळ्या होत्या, म्हणून बरे.
                                        आपल्या गुणपत्रिकांची फाईल घेऊन शाळांध्ये जावे लागे. एका ठिकाणी फाईल पाहून, निवड समितीतल्या एकांनी विचारले, “दिंडोरीला जायची तयारी आहे का? आता ऑर्डर हातात देतो.” मी दिंडोरीला जाणे शक्य नव्हते. ‘नाहीकाही म्हटले नाही. हुकमी एक्का हातात ठेवून सांगितले, “विचार करुन सांगतेआणि घरी परत आले.
                                     -३ ठिकाणी मुलाखतीला जाऊन आले. तिथे खूप उमेदवार होते, काही फर्स्ट क्लास M.A.,M.Com.,M.Sc. माझे धाबे दणाणले ह्यातून आपला निभाव लागणे अशक्य. मुलाखती दिल्या पण वाट पहाणे सोडून दिले. काही दिवस असेच गेले, मार्ग सापडेना !
                                     जून महिना सुरु झाला. एके दिवशी ग. . हायस्कूल (नाशिक)चा शिपाई दुपारचा घरी आला आणि सांगायला लागला, “तुम्हाला मोठ्याबाईंनी ताबडतोब बोलाविले आहे.” मी झटपट तयार झाले व शाळेच्या आवारांत प्रवेश केला. ती व्य दगडी इमारत, गर्द झाडीमध्ये कारंजा, त्यात मासे-कमळे पाहून मी भांबावले. मनांत विचार, ‘मोठ्याबाईंनी कशाला बोलाविले? नेमणूकीसाठी तर बोलाविले नसेल ना?’
                             गोंधळलेल्या मनःस्थितीत मी ऑफीसमध्ये प्रवेश केला.   बेताची उंची, स्थूल बांधा, गोऱ्यापान, सुंदर, मोठ्या केशसंभारावर माळलेली फुले, हंसतमुख अशा बाईंनी माझे स्वागत केले. मला बसावयास सांगितले. त्या म्हणाल्या, “तुमच्या नेमणूकीची ४ शाळांमधून पत्रे निघालेली आहेत. आमच्या शाळेचे नेमणूकीचे पत्र तुम्हाला येईल. आमची शाळा त्या शाळांपेक्षा उशीरा सुरु होईल तरी तुम्ही दुसऱ्या शाळेची नेमणूक स्वीकारु नका. १५ जूनला आमची शाळा सुरु होते. बरोबर ११ वाजता हजर व्हा. नेमणूकपत्र उशीरा येईल. काळजी करु नका. हजर झालेल्या दिवसांपासून तुमचा सेवाकाल सुरु होईल.” हे ऐकून मी स्वप्नांत तर नाही ना! असे मला क्षणभर वाटले. हवेत तरंगतच मी आनंदात घरी केव्हा पोहोचले? ते मला समजले नाही.
                      दि. १५ जून १९७० ला मी ग. . शाळेत शिक्षिका म्हणून हजर झाले. त्याकाळी इतर शाळांमधील शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळत नव्हते. . . हायस्कूल सरकारी शाळा असल्याने, मला सेवानिवृत्ती वेतन मिळणार होते.
                           खऱ्या अर्थाने मी बाईझाले. आत्तापर्यंत समाज मला आठवलेबाईम्हणून ओळखत  होता. कारण विवाहानंतर माझे आडनाव आठवलेझाले होते. मोलकरीण मला बाईम्हणत असे किंवा रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ति, “अहो बाईम्हणून संबोत असे.
                                  ग ग हायस्कूल विद्यार्थिनींची आमच्या बाईह्या उपाधीने मी आठवलेबाईम्हणून समाजात मान्यता पावले.
    प्रभा आठवले
माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः

Sunday, January 21, 2018


कै. चव्हाणसर (माजी चित्रकला शिक्षक, . . हायस्कूल, नाशिक)

                                     मी B.Ed.पास झाले. एका अर्थी प्रशिक्षित शिक्षिका Trained Teacher म्हणून शिक्षण क्षेत्रात मान्यता प्राप्त झाले. नाशिकच्या ग. . हायस्कूलमध्ये मला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाल्यावर, मला मनापासून खूप आनंद झाला. . . हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणजे सौ. आशाताई राजदेरकरबाई ह्यांच्याविषयी मी ऐकून होते, ‘बाई खूप कर्तबगार आहेत तश्याच कडक शिस्तीच्या आहेत.’ क्षणभर मनांत धाधूक निर्माण झाली ---- पण लगेच लक्षात आले की, . . हायस्कूलमध्ये आपल्या चाळीतले चव्हाणसरचित्रकला शिक्षक आहेत. मनाला खूप आधार वाटला. शाळेतील एकतरी व्यक्ती आपल्या परिचयाची आहे. चव्हाणसर म्हणजे आमचे अण्णा’. आम्ही सर्व त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांचे खरे नाव मला माहित  नाही.

                                 अण्णा म्हणजे मध्यम बांधा, सावळा रंग, डोळ्याला चष्मा पोशाख अगदी साधा पण स्वच्छ रहाणी टापटीपीची. त्यांच्या कुशल बोटांतून साकारलेल्या कलाकृती आजही आठवतात. मुळातले कोकणी असलेला चव्हाणपरिवार, गणपती उत्सवात अण्णांच्या मार्गदर्शनाखाली घरातील मल्या खोलीत एखाद्या देखाव्यात श्रीगजाननाची स्थापना करायचा.

                                  घरच्या गणपतीप्रमाणेच शाळेतील ड्रॉईंग हॉल कलेने परिपूर्ण रलेला असायचा. चव्हाणसरांचे हे कलादालन (ड्रॉईंग हॉल) शाळेलगत असलेल्या छोट्या इमारतीत वरच्या मजल्यावर होते. ही इमारत शाळेची खरी शोभा होती. ह्या इमारतीतून विद्यार्थिनींनी होमसायन्समध्ये केलेल्या पदार्थांचा घमघमाट सर्वत्र सुटायचा. गायनाच्या साथीला, शिवणयंत्रांचीही धून ऐकू यायची. वरच्या मजल्यावर विद्यार्थिनींमधील चित्रकार घडविण्याचे काम चव्हाणसर करीत असत. ह्या इमारतीसमोर डबलबार -सिंगलबार बाजुला मेरी-गो-राऊंड. शाळेतील विद्यार्थिनींचा आवडता स्पॉट. सदैव खेळण्याचा-हसण्याचा किलबिलाट चालू असायचा. एवढ्या दंग्यातही चव्हाणसर व त्यांच्या फाईन आर्टस्च्या विद्यार्थिनी चित्रकलेल्या विश्वात मग्न असायच्या. ह्या ड्रॉईंग हॉलच्या भिंती नेहमी कलाकृतींनी सजलेल्या असायच्या. भिंतींवर सरांनी स्वतः काढलेली चित्रे तसेच मुलींकडून काढून घेतलेली आकर्षक रंगातली प्रमाणबद्ध चित्रे दिसणार.

                                   शाळेच्या सेंट्रल हॉलसमोरील शोकेसमध्ये मुलींनी काढलेली महापुरुषांची चित्रे लावलेली असत. मला आजही एक चित्र आठवते, पंडित नेहरुंचे विद्यार्थिनीने काढलेले चित्र. ‘चाचा नेहरुआपल्यासमोर उभे आहेत, असा भास व्हायचा.

                                  'खरा मार्गदर्शक कसा असावा?’ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चव्हाणसर. चव्हाणसर विद्यार्थिनींमध्ये प्रिय होते पण विद्यार्थिनींनी ठराविक शिस्तीत राहिले पाहिजे, ह्यावर त्यांचा फार कटाक्ष.

                              रिकाम्या वेळांत चव्हाणसर ड्रॉईंग हॉलमध्ये काम करत बसत. काम असेल तरच ते शिक्षकांच्या खोलीत येत असत. शाळेत फक्त ते शिक्षकांच्या सभेत हजर असत. एरवी ते कुणाच्याही गप्पांत सामील होत नसत. कोणाशी त्यांचा  वाद झाल्याचे दृश्य कधी दिसले नाही. मी शाळेत शिक्षिका म्हणून कामास सुरवात केल्यानंतर, १ ते १॥ वर्षांतच सर  सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सहवासाचा कालावधी फार थोडासा होता. ‘प्रत्येकाने आपल्या कामाशी प्रामाणिक रहावे’. ही शिकवण कळत-न कळत आपल्या वृत्तीतून त्यांनी दिली असे मला वाटते.

प्रभा आठवले

माजी शिक्षिका- . . हायस्कूल, नाशिक

Sunday, January 14, 2018


गोदाभूमीत प्रवेश :-

                            १९७० साली मी B.Ed.चीपरिक्षा पास झाले. B.Ed.ला मराठी व इंग्लिशही Method घेतली.

                            लग्नाच्यावेळी मी फक्त इंटरआर्टस् होते. नवीन जीवनाला सुरवात झाली. सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्यात काळ घालवावाच लागतो. नवीन घर, घरातील माणसे, दोन घरांतील रहाणीमानातील फरक, रिती-रिवाज भिन्न, नवीन गाव, तेथील स्थानिक परिस्थिती माणसांच्या मनाची भिन्न घडण, या सर्व चक्रव्यूहातून प्रत्येक स्त्रीला, आपली वाट शोधावी लागते. त्यामुळे शिक्षणात खंड पडला. माझे मन चूल आणि मूलह्या रिंगणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. त्यातच नवीन अपत्याची चाहूल लागली आणि मनाला जबाबदारीची जाणीव होऊ लागली. मुलाचे संगोपन, त्याचे शिक्षण, त्याच्या जीवनास योग्य वळण, त्याचा सर्व दृष्टीने विकास व्हावयाचा असेल तर आर्थिक बाजू क्कम व्हावयास हवी; ह्या गोष्टीची तीव्र जाणीव होऊ लागली, पण -----

                             माझी मुलगी शाळेत जाऊ लागेपर्यंत, मला काहीच करणे शक्य नव्हते. माझ्या मुलीने तोही प्रश्न लवकरच सोडविला. २ वर्षापासूनच हट्टाने शाळेत जाणे सुरु केले. तिची शाळा, तिच्या मैत्रिणी ह्यात तिचा वेळ बाहेर जाऊ लागला. मला विचार करावयास निवांत वेळ मिळाला. मन सांगू  लागले, ‘आता शिक्षण पूर्ण कर. माझी विद्यार्थीदशा सुरु झाली, मी S.T.C. (Secondary Teachers Course)चा क्लास जॉईन केला. क्लास संध्याकाळचा होता. दिवसर काम, स्वयंपाकपाणी, पाहूणारावळा ह्यातच वेळ संपायचा. संध्याकाळी S.T.C. च्या क्लासला जाणे सुरु झाले.

                        S.T.C.ला काही Lessons घ्यावे लागत. लग्नाच्या आधी मी काही काळ बुलढाण्याला शाळेत नोकरी केल्यामुळे, मला ५०च्या ऐवजी ३० Lessons घ्यावे लागले.

                          त्या Lessons साठी नाशिकमधील निरनिराळ्या शाळांमध्ये मला पाठ घ्यावयास जावे लागे. एक चक्कर Unit साठी, नंतर त्या शाळेचे वेळापत्रक पाहून त्याप्रमाणे Lesson साठी जावे लागे.Lesson साठी Teaching Aids तयार करावी लागत. एका हातात Lessonची File,Teaching Aids; दुसऱ्या हातात डस्टर-खडू, रोलप-फळा अशा थाटात वर्गात प्रवेश करावा लागे. ह्या धावपळीत सर्व दिवस संपून जायचा. एकदाची S.T.C.झाले. माझे क्वॉलिफिकेशन इंटर एस्. टी. सी.’ झाले, पण ह्या गुणवत्तेवर नोकरी मिळण्यास अडचणी येऊ लागल्या.

                            काही दिवस शिकवण्या करुन पाहिल्या, पण त्यात मन रमेना. एका वयस्कर बाईंना शिकविले. त्या मॅट्रिक पास झाल्या. खाजगी बालवाडी शाळेत त्यांना नोकरी मिळाली आणि मी त्यांची कायमची बाई झाले. धी त्या आजी भेटल्या की, त्यांच्या नातींना ह्या माझ्या बाई अशी माझी ओळख करुन देत असत’. नातींना फार आश्चर्य वाटे. आपल्या आजीच्या ह्या बाई आजीपेक्षा लहान वयाच्या कशा ? आज त्या आजी हयात नाहीत पण माझ्या ह्या पहिल्या विद्यार्थिनीने यशस्वी  शिक्षिका होऊन, मला खूप समाधान दिले.

                               आपण आता पदवी मिळवायचीहा एकच ध्यास मनाने घेतला. रात्रीचा S.N.D.T. चा क्लास सुरु केला. पुन्हा धावपळीचे जीवन सुरु झाले. एकदाची मी B.A.झाले. परत नोकरीसाठी प्रयत्न सुरु झाले, कारण आता मी पदवीधर होते ना ! पण तिथेही योग्य मार्ग मला सापडेना. कुठे Part-Time तर कुठे Leave vacancy त माझी नेमणूक व्हावयाची. काम पुष्कळ, तात्पुरती नोकरी, अल्प वेतन ह्या चक्रातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

    प्रभा आठवले

माजी शिक्षिका - . . हायस्कूल, नाशिक

क्रमशः